बहिणीचा क्ष्वास थांबल्यावर शेजारी भावानी गळफास लावुन स्वत:ला संपवल, सातारा जिल्ह्यात विचीत्र घटना
सातारा : हि कहाणी आहे स्नेहन आणि दत्तात्रय यांची.दोघांचीही घरं जवळ होती.परिणामी त्यांच्यात जवळीकता निर्माण झाली.त्यांनी एकत्र राहण्याचं ठरवलं सुद्धा.पण,अडचण आली ती घरच्यांची.स्नेहलच्या घरच्यांना दत्तात्रय पसंत नव्हता.त्यामुळं त्यांनी तिचे दुसरीकडे लग्न लावुन दिले.पण ती समाधानी नव्हती.२ महिन्यांनी माहेरी परतली.तेव्हा ती दत्तात्रयला भेटायला गेली.
मनात तु माझी का होऊ शकली नाही,याचा दत्तात्रयाच्या मनात राग होता.म्हणुन त्याने अतिशय भयानक निर्णय घेतला.स्नेहलला घरी बोलवल्यानंतर तिच्यावर वार केले.तीने प्राण सोडले.त्यानंतर त्यानेही स्वतःला गळफास लावुन आयुष्य संपवलं.आज सकाळी दोघांचेही मृतदेहच सापडले.या थरारक घटनेने सातारा जिल्ह्यातलं वांझोळी गाव अक्षरशा हादरलं आहे.
२ महिन्यांपूर्वी झाला विवाह
सातारा जिल्ह्यात माण तालुक्यातील वांझोळी या गावात धक्कादायक घटना घडली आहे.प्रेम प्रकरणातुन एका प्रेमवीराने नवविवाहितेचा खुन करून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.स्नेहल वैभव माळी असे खुन झालेल्या महिलेचे नाव आहे.तर दत्तात्रय सुरेश माळी असे प्रेमवीराचे नाव आहे.या दोघांत माऊस भाऊ-बहिणीचं नातं आहे.रात्री उशिरा हि घटना घडली.
याची माहिती समजताचं पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.दोघांचे मृतदेह एका घरात आढळुन आले आहेत.माण तालुक्यातील वांझोळी येथील दत्तात्रय आणि स्नेहल यांचे एकमेकांवर प्रेम होते.मात्र घरातील मंडळींनी २ महिन्यापुर्वी स्नेहलचा लग्न लावुन दिलं होत.
काल रात्री काय घडलं?
स्नेहल ही २ महिन्यांनंतर माहेरी वांझोळीत आली होती.दत्तात्रय यांचे घर तिचा घराच्या काही अंतरावरच होते.काल संध्याकाळच्या सुमारास दत्तात्रयनी स्नेहलला आपल्या घरी बोलावले होते.यावेळी घरात कोणी नसल्याचा फायदा घेत दत्तात्रयने स्नेहल हिच्यावर शस्त्राने सपासप वार केले.यामध्ये स्नेहल ठार झाली.यानंतर दत्तात्रेयने त्याच घरात स्वतः गळफास घेतला.या घटनेने सातारा शहरात खळबळ उडाली आहे.