रायगडमध्ये एकमेकांचा हाथ घट्ट धरत माय-लेकानी समुद्रात दिला जीव, कारण उघडताचं प्रत्येकाच्या अंगावर आला काटा

रायगडः कोकणात रायगड जिल्हयात मुरुड काशीद समुद्र किनाऱ्यावर दोन पर्यटक बुडून मृत्यू झाल्याच्या घटनेला वेगळे वळण मिळाले आहे. चार दिवसांपूर्वी काशीद समुद्रकिनारी ही घटना घडली होती सुरुवातीला या दोन्ही मायलेकांचा पर्यटक म्हणून समुद्रात पोहताना मृत्यू झाल्याचा अनेकांचा समज झाला होता. गुरुवारी काशीद समुद्रकिनारी सकाळी हे दोन्ही मृतदेह सापडले होते.

मात्र या दोन्ही मायलेकांनी ठरवून आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.आर्थिक विवंचनेमुळे हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आई डोर्थी बेंजामिन फेड्रिक (वय ७३) तर मुलगा विजय लिओनेल अल्फ्रेड (वय ४६) अशी आत्महत्या केलेल्या दोघांची नावे आहेत. हे गेले काही वर्ष कल्याण येथे स्थायिक होते. मात्र हे दोघेही मूळचे कोटगिरी व्हिलेज जिल्हा निलगिरी राज्य तामिळनाडू येथील आहेत.

मुरुड तालुक्यातील काशीद समुद्र किनारी पर्यटनाकरिता आलेल्या आई व मुलाचा समुद्राच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचा अंदाज सुरुवातीला सगळ्यांनीच व्यक्त केला होता. मात्र समुद्रकिनाऱ्यावर एक गाडी उभी दिसली त्यामुळे मुरुड पोलिसांना या सगळ्या प्रकरणात संशय आल्याने त्यांनी अधिक तपास सुरू केला होता.

हे दोघेही कल्याण येथील रहिवाशी आहेत आई डोर्थी बेंजामिन फेड्रिक (वय ७३) तर मुलगा विजय लिओनेल अल्फ्रेड (वय ४६) अशी आत्महत्या केलेल्या दोघांची नावे आहेत. गुरुवारी सायंकाळी ७.४५च्या सुमारास काशिद जवळच्या पूर्वी चिकणी समुद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या किनाऱ्यावरील कावडा भागात ही दुर्दैवी घटना घडली होती.

आई डोर्थी बेंजामिन फेड्रिक व मुलगा विजय लिओनेल अल्फ्रेड हे कल्याण येथून आत्महत्या करण्याचा प्लॅन ठरवूनच घरातून बाहेर पडले होते. मुलगा विजय याची करोना काळात नोकरी गेली होती. त्यानंतर दुसरा जॉबही गेला होता त्यामुळे हे दोघेही आर्थिक विवंचनेत होते. आत्महत्या करण्यापूर्वी विजयने आपला मोबाईल लॅपटॉप या सगळ्याचा फॉरमॅट मारल्याने पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान निर्माण झाले होते.

पण ३ एप्रिल रोजी विजयाने एका मैत्रिणीला केलेला कॉल तपासात समोर आल्याने या सगळ्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली. कल्याण येथील घरातून बाहेर पडण्यापूर्वी घरातील सगळ्या वस्तू विजय याने आपल्या मैत्रिणीला देऊन टाकल्या होत्या. मात्र विजय गावाला चालल्याने वस्तू दिले असतील असा तिचाही समज झाला पण पोलिसांकडून आत्महत्या प्रकाराची माहिती करतात त्या मैत्रिणीलाही मोठा धक्का बसला.

दोघांचे कोणी नातेवाईक मृतदेह ताब्यात घेण्यासाठी न आल्याने मुरुड पोलिसांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. उटी तामिळनाडू येथील नातेवाईकांनीही या दोघांशी संबंध तोडल्याची माहिती मुरूड पोलीसांच्या तपासात समोर आली आहे. हे दोघेही ख्रिश्चन धर्मीय असल्याची माहिती मुरुड पोलिसांच्या तपासात समोर आली आहे.

मृत मायलेक दोघेही कल्याण येथील टीएमसी शाळेजवळ दहीघर गाव शिळासती येथील रहिवासी होते.मुरुड पोलिसांनी चौकशी केल्यावर त्यांचे कोणतेही नातेवाईक आढळून आलेले नाहीत. त्यामुळे या दोघांचे शव वाशी येथील शवागृहात ठेवण्यात आले आहेत.

दरम्यान, दोघा मायलेकांनी सोबत आणलेली वॅगनार कार काशीद समुद्र किनारीच पार्क करून त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांना या बेवारस स्थितीत असलेल्या गाडीचा संशय आल्याने गाडीच्या नंबरवरून शोध लावत पोलिसांनी या मृतदेहांची नावे समजली. फेसबुकवरुन मिळालेल्या फोटोच्या आधारे मृतदेहाची ओळख पटली.

त्यानंतर उभी असलेली गाडी उघडल्यानंतर आतमध्ये काही कागदपत्रे व आधारकार्ड वगैरे पोलिसांना सापडले. या घटनेचा अधिक तपास मुरुड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अविनाश झावरे व पोलीस नाईक सागर रोहेकर हे करीत आहेत.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *