लातुरमध्ये २५ वर्षाची वहिणी दिराला दिलं देऊन बसली, नंतर शारिरीक संबंध अन् आता भलतचं झालं

शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात एक खळबळजनक असा प्रकार कोंढवा परिसरात समोर आलेला असून दोन चिमुकल्या मुलांसह त्यांच्या आईचा खून करून मृतदेह जाळून टाकण्याचा प्रकार समोर आलेला आहे.

सदर प्रकरणी महिलेचा चुलत दीर असलेला व्यक्ती याला ताब्यात घेण्यात आलेले असून विवाहबाह्य संबंधातून हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे.उपलब्ध माहितीनुसार, आम्रपाली वाघमारे ( वय 25 ) आणि तिची एक मुलगी आणि एक मुलगा अशी मयत व्यक्तींची नावे असून आत्तापर्यंतच्या तपासात आरोपी असलेला महिलेचा चुलत दीर वैभव रूपसेन वाघमारे ( वय 31 राहणार लोहटा जिल्हा लातूर ) असे आरोपीचे नाव आहे.

मयत आम्रपाली हिचे तिच्या चुलत दिरासोबत प्रेमसंबंध सुरू झाले आणि त्यानंतर त्यांनी संसार करण्याच्या उद्देशाने तेथून पलायन केले आणि ते पुण्यामध्ये राहायला आलेले होते.विवाहित असलेली आम्रपाली ही तिच्या दोन मुलांना घेऊन वैभव याच्यासोबत संसार करण्याच्या उद्देशाने पुण्यात येऊन राहू लागलेली होती मात्र काही दिवसातच वैभव याने तिच्यावर संशय घेण्यास सुरू केले.

कोंढवा परिसरातील पिसोळी भागात या दोघांनी संसार थाटला होता मात्र त्यांच्यात वाद झाल्यानंतर आरोपी वैभव याने तिला ठार मारले आणि त्यानंतर तिची मुले रडत असल्याकारणाने त्यांना देखील मारून टाकत सर्वांना त्याने जाळून टाकलेले होते. सदर घटनेचा पोलीस तपास करत आहेत.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *