वडिलांनी नवीन घर बांधल😥, किचनमधीचं लोखंडी अँगललाचं सिध्देशनी लावला गळफास😥; रत्नागिरीतील विचीत्र घटना

रत्नागिरी : रत्नागिरी शहराजवळ असलेल्या शिळ गावात २६ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अलिकडेच त्याच्या वडिलांनी नवीन घर बांधलं होतं मात्र या घरामधील किचनमध्येच मुलाने गळफास लावून आत्महत्या केल्याच्या प्रकाराने मोठी खळबळ उडाली आहे. सिद्धेश अशोक कदम (वय २६ वर्ष, राहणार शीळ कदमवाडी ता. जि. रत्नागिरी) असे या तरुणाचे नाव आहे.

या सगळ्याची खबर रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात अशोक कदम यांनी दिली आहे. मुलगा सिद्धेश अशोक कदम याने चार सप्टेंबर रोजी त्यांचे नवीन घरातील किचनमध्ये आयुष्य संपवलं. इथलं दृश्य पाहून सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली.

नवीन बांधलेल्या घराच्या किचन रुममधील छताच्या लोखंडी अँगलला गळफास लावलेल्या स्थितीत वडिलांना मुलगा दिसला. त्यांनी तात्काळ वाडीतील लोकांना याची माहिती देऊन त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र गळफास घेतलेल्या या तरुणाची प्राणज्योत मालवली होती.

उपचाराकरिता सिव्हील हॉस्पिटल रत्नागिरी येथे नेल केले असता येथील वैद्यकीय अधिकारी यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. या सगळ्या धक्कादायक घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास रत्नागिरी पोलीस करत आहेत. मात्र या घटनेमुळे कदम कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *